प्रतिनिधी/कास
सातारा : सह्याद्रीच्या कडेकपारी डोंगररांगा म्हटले की जणू काही निसर्गाचा खजानाच आणि कास परिसर म्हटले की निसर्गाची वेगळी पर्वणीच. येथे कोणत्याही मौसमात आले तरी निसर्गाचा वेगवेगळा आविष्कार अनुभवायास मिळतो. आता पावसाळी पर्यटनाचा आंनद घेण्यासाठी पर्यटक कास परिसरात दाखल होऊ लागले असून पावसात ओले चिंब होत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
पावसाळयात अतिपर्जन्यवृष्टीचा भाग म्हणून कास, बामणोली, जुंगटी, भांबवली, एकीव, केळवली परिसराची ओळख आहे. येथील दाट धुके, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, कास तलाव, पाण्याने खळखळणारे ओढे, घनदाट झाडी, हिरव्यागार डोंगररांगा पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत.
हे ही वाचा : कास तलावची जुनी साठवण पाणी पातळी पुर्ण; नव्या पातळीकडे वाटचाल
गेल्या आठ दहा दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढलं आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची ओसंडून वाहणाऱ्या एकीव धबधबा, केळवली धबधबा, कास पठा, कास तलाव व भांबवली परिसरात वर्दळ पहायला मिळत आहे. काही हौशी पर्यटक पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत धबधबे व खळखळणाऱ्या ओढयावर फोटोशेसन करताना दिसत आहेत. त्यातच हॉटेलमध्ये गरमागरम भजी, वडापाव, चहा, शेगांचा अस्वाद घेत आहेत.