अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 22 एप्रिल 2022, सकाळी 11.30
● जिल्हावासियांनी सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्यावी
● कोरोनामुक्त जिल्ह्यात पुन्हा शिरकाव नको म्हणून प्रशासन अलर्ट
● शुक्रवारच्या अहवालात केवळ एक बाधित
सातारा / प्रतिनिधी :
देशात दिल्लीसह काही राज्यात कोरोना रूग्ण वाढू लागल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना हद्दपार झाला असून एखादा रूग्ण आढळत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव होऊ नये, यासाठी जिल्हापरिषद आरोग्य विभागाने सार्वजनिक ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान शुक्रवारच्या अहवालात जिल्ह्यात फक्त एक रूग्ण वाढला आहे.
उन्हाचा तडाखा वाढला
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढ शुन्य ते एकवर असून आता फारसा धोका उरलेला नाही. मात्र उन्हाचा तडाखा वाढल्याने जिल्हावासिय हैराण झाले आहेत. दुपारनंतर उन्हाचा तडाखा प्रचंड वाढल्याने नागरिकांना इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाची लाट सर्वत्रच ओसरली असली तरी आता उष्माघात वाढत असल्याची चिन्हे आहेत.
बुस्टर डोसला प्राधान्य
नागरिकांसह वयोवृद्ध नागरिक लसीकरणाला प्रतिसाद देत असून बुस्टर डोसलाही प्रतिसाद मिळत आहे. बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांची लसीकरण केंद्राकडे पावले वळत आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा धोका वाढणार नाही याची शक्यता निर्माण होत आहे.
शुक्रवारी
नमुने-184
बाधित-01
मृत्यू-00
सक्रिय-02
शुक्रवारपर्यंत
नमुने-25,76,164
बाधित-2,79,227
मृत्यू-6,683
मुक्त-2,71,850