जिह्याचा निकाल 98.29 टक्के, दहावीतही मुलींची सरशी,
प्रतिनिधी/ सातारा
दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सातारा जिह्यात 732 माध्यमिक शाळा, 116 परीक्षा केंद्रे, 647 उपकेंद्रावर दहावीची परीक्षा पार पडली होती. जिह्यातून 38 हजार 761 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 38 हजार 601 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामधून 37 हजार 944 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 98.29 टक्के जिह्याचा निकाल लागला आहे. त्यामध्ये 97.80 टक्के मुले तर 98.85 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींनी सरशी मिळवली आहे. सातारा जिह्याने कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर जिह्यात जावली तालुक्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.
दहावीसाठी सातारा जिह्यात सातारा जिह्यात 732 माध्यमिक शाळा 116 परीक्षा केंद्रे 647 उपकेंद्रावर परीक्षा झाली होती. त्याकरता नियमित विद्यार्थ्यांनी 38 हजार 761 नोंदणी केली होती. त्यापैकी 38 हजार 601 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 37 हजार 944 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 98.29 ंटक्के लागला आहे तर पुनःप्रविष्ठ विद्यार्थ्यांचा दहावीचा सातारा जिह्याचा निकाल 79.35 टक्के लागला आहे. त्याकरता जिह्यातून 1220 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1201 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 953 विद्यार्थी उतीर्ण झाले. आपला निकाल पाहण्यासाठी पालकांनी स्मार्ट फोनचा वापर केला. आपल्या पाल्याला चांगले गुण मिळाल्याचे समजताच लगेच शाळेत जावून त्या मुलांच्या शिक्षकांना ही बातमी देऊन त्यांनी जल्लोष केल्याचे चित्र साताऱयात ठिकठिकाणी पहायला मिळत होती. मिठाईच्या दुकानात पालकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निकाल लागला असल्याने सर्वच ठिकाणी आनंदीआनंद दिसत होता.
मुलांपेक्षा मुलींच हुशार
यावर्षीही सातारा जिह्यात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीमध्ये मुलींच पुढे असून त्यामुळे नोंदणी 20 हजार 559 मुलांनी केली होती. त्यापैकी 20 हजार 473 प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 20 हजार 23 मुले उत्तीर्ण होऊन 97.80 टक्के निकाल लागला. तर 18 हजार 202 मुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 18 हजार 128 मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 17 हजार 921 जणी उर्त्तीण झाल्या असून 98.85 टक्के निकाल लागला. त्यामुळे मुलांपेक्षा मुलीं 1.05 टक्के आहे.
जावली पॅटर्नचा बोलबाला
जावली तालुक्याने यावर्षी दहावीच्या परीक्षेत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामध्ये जावली तालुक्यातील 1120 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1117 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1110 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 99.37 टक्के निकाल लागला. कराड तालुक्यातील 7 हजार 462 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7 हजार 441 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 7 हजार 337 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने 98.60 टक्के निकाल लागला. खंडाळा तालुक्यातून 2 हजार 189 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 181 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 हजार 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 98.30 टक्के निकाल लागलेला आहे. खटाव तालुक्यातून 3 हजार 278 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 264 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 3 हजार 201 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 98.06 टक्के निकाल लागला आहे. कोरेगाव तालुक्यातून 3 हजार 51 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 हजार 982 विद्यार्थी उतीर्ण झाल्याने निकाल 98.22 टक्के निकाल लागला.
माण तालुक्यातून 3 हजार 78 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 52 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 3 हजार 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने 98.46 टक्के निकाल लागला. महाबळेश्वर तालुक्यातून 1 हजार 524 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1519 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1503 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 98.94 टक्के निकाल लागला आहे. फलटण तालुक्यातून 4 हजार 289 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4278 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 4 हजार 153 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल 97.07 टक्के लागला आहे.
पाटण तालुक्यातून 3 हजार 460 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 455 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 3 हजार 394 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल 98.23 टक्के निकाल लागला आहे. सातारा तालुक्यातून 6 हजार 769 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 725 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 6 हजार 605 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने 98.21 टक्के निकाल लागला आहे. वाई तालुक्यातून 2 हजर 541 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 533 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 हजार 510 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 99.09 टक्के लागला आहे.
गुरुकुलच्या जुईला 100 टक्के
दहावीच्या निकालामध्ये साताऱयातील गुरुकुल स्कूलच्या जुई गोखले हिने रेकॉर्डच आजपर्यंतचे सातारा जिह्यातील मोडले आहे. 100 टक्के मिळवले आहेत. त्याबाबत तिला प्रतिक्रिया विचारली असता ती म्हणाली, मलाच विश्वास बसत नाही की 100 पैकी 100 टक्के मार्क्स मला मिळाले आहेत ती. मी 99 टक्के पडतील असे गृहीत धरले होते. मला सीए व्हायच आहे, असे सांगितले.
गुरुकुलची विद्यार्थीनी जुई गोखले हिने 100 गुण मिळवल्याचे समजताच गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन केले. तिचे वडील सेल्स टॅक्स ऑफिसर आहेत. तर आई गृहीणी आहे. तिचे वडिल म्हणाले, तिच्या यशामध्ये गुरुकुल शाळेचा मोलाचा वाटा आहे. शाळेने कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेतला. त्यामुळे गुरुकुल शाळेचे खूप आभार मानतो. शाळेचे अध्यक्ष चोरगे साहेबांचे आभार मानतो. तसेच जुईला प्रतिक्रिया विचारली असता ती म्हणाली, मला क्षणभर विश्वास बसला नाही. की 100 पैकी 100 गुण मला मिळाले आहेत ते. मला अपेक्षा 99 टक्यापर्यंतची होती. माझी आई, वडिल यांनी माझ्याकडून अभ्यास करवून घेतला. माझ्या शाळेनेही आम्हा विद्यार्थ्यासाठी खूप चांगले उपक्रम राबवले. मला पुढे सी. ए. व्हायचे आहे.