मंत्री देसाई यांनी आस्थेने प्रश्न ऐकून घेतल्याने प्रहार संघटना आणि दिव्यांग सामाजिक प्रेरणा संघटनेने मानले आभार
सातारा / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 5 टक्के निधीचा वाटप करण्यात विलंब होतो. नगरपालिकेत दिव्यांग निधीचा दुरुपयोग करण्यात येतो. दिव्यांगाचे 5 आरक्षणानुसार सरकारी जागा भरण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून त्या अनुषंगाने प्रहार व दिव्यांग प्रेरणा सामाजिक संघटनाचे प्रतिनिधीनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली. मंत्री देसाई यांनी सर्व समस्या ऐकून घेऊन येत्या अधिवेशनात तुमच्या समस्या सोडवू अशी ग्वाही दिली.
जिल्ह्यासह राज्यातील दिव्यांग बांधवांवर अन्याय सुरू आहे. 5 टक्के निधीचा वापर नियमितपणे होत नाही. गैरवापर होत आहे. गाव पातळीवर आणि शहरात आपल्याच जवळच्याना वाटप होते. खरे लाभार्थी लाभापासून वंचित रहात आहेत. अनेक शासकीय कार्यालयात दिव्यांग रॅप नाही. नगरपालिका क्षेत्रात दिव्यांगाच्या वाट्याला आलेला निधी अन्यत्र वळवला जात आहे. सरकारी नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण आहे हे आरक्षण आज पर्यंत योग्य पध्दतीने राबविण्यात आले नाही. बिंदू नामावली केली नाही, आदी विविध मागण्यांसाठी प्रहार व दिव्यांग सामाजिक प्रेरणा संघटनेचे अजय पवार, शैलेंद्र बोर्डे, आनंदा पोतेकर यांनी मंत्री देसाई यांची भेट घेतली. त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यावर देसाई यांनी आमची बच्चू कडू यांच्याशी चर्चा झाली आहे. विधानसभा अधिवेशनात सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देत आंदोलन करू नका अशी विनंती केली.
अन दिव्यांग बांधव झाले भावुक
एखादा मंत्री आर्वजून दिव्यांग बांधवांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ देतो आणि थांबतो. त्यांच्या शी चर्चा करतो हे पाहून मंत्री असावा तर देसाई यांचासारखाच अशी भावना दिव्यांग बांधवांमधून उमटत होती.