प्रतिनिधी/ सातारा
वयाने अतिशय लहान असूनही सादरीकरणांमध्ये अतिशय सुरेख कसं मिळवलेल्या सातारा येथील स्थानिक कीर्तन कलाकार ध्रुव पटवर्धन याने समर्थ सदनमध्ये सलग तीन दिवसाचा किर्तनात अतिशय सुरेख सद्दुरु महात्म वर्णन करत उपस्थित श्रोत्यांची मनी जिंकली.
श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने आयोजित केलेल्या चातुर्मास कार्यक्रमांतर्गत पहिल्या दिवशी ध्रुव पटवर्धन याने सद्गुरुचे महत्व सांगणारा संत तुकारामांचा ..सद्गुरु वाचून सापडेना सोय.. हा अभंग घेत त्यावर निरूपण केले. जीवनामध्ये सद्गुरु चे महत्व किती अनिवार्य आहे असे सांगताना उत्तर रंगात दत्तपुराणातील अलर्क राज्याची कथा सांगत दत्तगुरूंनी त्याला ज्ञानदीक्षा दिल्यामुळे कसे ज्ञान प्राप्त झाले याचे वर्णन केले. दुसऱक्या दिवशी समर्थ रामदासांचा ..भावचि दृढ झाला.. हा अभंग अख्यानात घेत भाव किती महत्त्व आहे हे सांगत समर्थांच्या केलेल्या तपश्चर्येतून त्यांनी एका गावात प्रेत कसे उठवले याची कथा सांगितली. तिसऱया दिवशी गुरु दत्तात्रेय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या माहूरगड येथील समर्थांना दत्तात्रय यांनी दिलेल्या दर्शनात समर्थ रामदासांनी नामाचे महत्त्व कसे वर्णन केले आहे हे सांगणारा ..राम गावा राम घ्यावा.. या अभंगावर सुरेश निरूपण केले लहान वयापासून कीर्तनात तरबेज झालेल्या ध्रुव याने ..मी सावरकर.. या कथाकथन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केले आहे. पंतप्रधान युवा योजनेच्या अंतर्गत ध्रुव पटवर्धन यांच्या पुस्तकाला तीन लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून लवकरच या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, सुप्रसिद्ध निरूपणकार सुनीताताई सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या तीन दिवसीय प्रवचन मागेमध्ये श्रवण भक्ती, दास्य भक्ती याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. आपले चित्त हे नेहमीच विविध कंगोरे यांनी भरलेले आहे, त्यासाठी संत समागम आवश्यक आहे तर आपले काम सोपे होईल आणि मन स्वच्छ झाले म्हणजेच चित्तशुद्धीसाठी सत्संग आवश्यक आहे. सद्गुरुजवळ जाऊन त्यांच्या ग्रंथांचे वाचन श्रवण करणे महत्त्वाचे आहे. सहस्त्रबुद्धे यांनी संस्काराची संततधार आपल्यावर जी पडत आहे ती आज उद्या यावर्षी या जन्मी नव्हे तर पुढील जन्मी ही पडतच राहिली. अहंकार सर्वांनाच आहे, या अहंकाराचे विविध प्रकार आहेत.
या सर्व कार्यक्रमांना किर्तनाचे वेळी तबला साथ मिलिंद देवरे यांची असून संवादिनी साथ बाळासाहेब चव्हाण हे करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश असल्याने सर्वांनी मोठय़ा संख्येने या चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट दरम्यान मिरज येथील समर्थ भक्त कौस्तुभ बुवा रामदासी यांचे किर्तन होणार असून 4 व 5 ऑगस्टला डोंबिवली येथील समर्थ भक्त अलकाताई मुतालिक यांचे प्रवचन होणार आहे.
दरम्यान, पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. मकरंदबुवा करंबेळकर यांनी तीन दिवसीय किर्तन मालेमध्ये दास्यभक्ती आणि गुरु महात्म्य यावर विस्तृत सोदाहरण पूर्वक आपली किर्तन रंगवले. विठ्ठलाची दास्य भक्ती आणि त्यामध्ये विठ्ठलाचे भक्त असणाऱया दामाजीपंतांचे चरित्र खास एकादशीनिमित्त मकरंद बुवा यांनी सादर केले. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींचा अभंग निरूपणासाठी घेत सद्गुरूंचे चरित्र व शिष्यांच्या अनेक गोष्टींचे याचा सांग वर्णन आपल्या किर्तनात करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले.