वीजवाहिन्या, खांब तुटून चार लाखांचे नुकसान : झाडे कोसळून रस्ता वाहतुकीत अडथळे : म्हादई नदीच्या पाणी पातळी वाढली
प्रतिनिधी /वाळपई
आज दिवसभर सत्तरी तालुक्मयात वादळी वाऱयाचा फटका बसून वीज खात्याची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली आहे. यामध्ये चार लाख रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही मोजकी गावे वगळता इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यास खात्याची यंत्रणा यशस्वी ठरलेली आहे.
सकाळी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये शुक्रवारी सकाळपासून वादळी वारा सुरू होता. यामध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज वाहिन्यांची मोठी नुकसानी झाली. अग्निशामक दलाच्या यंत्रणेने अनेक ठिकाणी पडलेली झाडे रात्री उशिरापर्यंत हटविण्यात यश मिळवले.
कोकाटे पशुपती केंद्र येथे वादळ वाऱयामुळे विजेचे सहा खांब मोडले असून वीज वाहिन्यांची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली आहे. त्याचप्रमाणे वेळगे येथील भटवाडी भागांत विजेचे सहा खांब मोडले व यामुळे सदर भागातील वीजपुरवठा ठप्प झालेला आहे. सदर प्रकार शुक्रवारी संध्याकाळी घडल्यामुळे त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेता आले नाही. मात्र शनिवारी सकाळी या ठिकाणी दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती विद्युत खात्याचे सहाय्यक अभियंता दीपक गावसे यांनी दिली.
आज सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल!
वाळपई शहरांत विजेचा एक खांब मोडल्यामुळे नुकसानी झाली. त्याचप्रमाणे होंडा परिसरातील एकूण सहा खांब मोडल्यामुळे तीन लाखांची नुकसानी झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. यामुळे दिवसभरात जवळपास वीस खांब म्हणून वीस खात्याची जवळपास चार लाखांची नुकसानी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालेला आहे त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम शनिवारी हाती घेण्यात येणार असून शनिवारी संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे अभियंता दीपक गावस यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
ठिकठिकणी झाडे कोसळून वाहतुकीत अडथळे
दरम्यान अनेक ठिकाणी झाडे पडून रस्ता बंद होण्याचे प्रकार घडले. मिळालेल्या माहितीनुसार सातोडे येथील फणसाचे झाड पडून विजवाहिनी तुटली. पर्ये आंबेशीवाडा येथील अंतर्गत रस्त्यावर झाड पडून काही प्रमाणात वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. गवाणेत संध्याकाळी 6 वा. रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक खोळंबली. वाळपईत उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे झाड कोसळल्याने समस्या निर्माण झाली.
अग्निशामक दलाच्या मदतीने झाडे वाहतूक सुरळीत
रस्त्यांवर निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी वाळपई अग्निशामक दलाच्या कर्मचाऱयांनी मोठी कामगिरी बजावली. यात एस. के. गावकर अशोक नाईक ,सुधाकर गावकर, रामा नाईक, अविनाश गावकर, डी जे गावस देविदास गावडे यांचा समावेश आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांनी रस्त्यांवर कोसळलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत केल्याचे सांगितले.
सध्या डोंगराळ भागांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे म्हादई नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पावसाचे असेच राहिल्यास नदीच्या पाण्याची पातळी वाढून पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.