मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून इलेक्ट्रिक बसेस देण्याचे आश्वासन : प्रशासन जनतेच्या दारी कार्यक्रम सरपंच, पंचांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी
वाळपई : सत्तरी तालुक्यामध्ये कोविडनंतर प्रवासी वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे. या समस्या दूर करण्यासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसची व्यवस्था या तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी वाहतूक समस्या समस्या दूर होणार आहे, असे प्रतिपादन वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासन तुमच्या दारी या योजनेअंतर्गत सत्तरी तालुक्यातील सरपंच, जिल्हा पंचायत सभासद नगराध्यक्ष, नगरसेवक वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी यांच्या संदर्भात घेण्यात आलेल्या संवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पर्ये मतदारसंघाचे आमदार डॉ. देविया राणे, उपजिल्हाधिकारी प्रवीण परब मामलेदार दशरथ गावस, मामलेदार अपूर्वा कर्पे गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर व इतरांची उपस्थिती होती.
ग्रीन टॅक्स रद्द करण्याची मागणी
खाणग्रस्त परिसरामध्ये असलेल्या वाहनांसाठी लागू करण्यात आलेल्या ग्रीन टॅक्स रद्द करावा. गेल्या दहा वर्षांपासून खाण व्यवसाय पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यामुळे ग्रीन टॅक्स पूर्णपणे रद्द करावा अशी मागणी पिसुर्ले सरपंच देवानंद परब केली. यावर या संदर्भात निश्चितच प्रयत्न करण्यात येतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असून शक्य असल्यास निश्चितच या भागातील खाणग्रस्तांना मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
वाहने भंगारात काढण्यात येऊ नयेत
दहा वर्षापासून खाणी बंद आहेत. त्यापूर्वी अनेकांनी नवीन ट्रक घेतले. मात्र त्यानंतर खाण व्यवसाय बंद झाला. त्या ट्रकांना जवळपास बारा वर्षे झालेली आहे. सरकारच्या कायद्यानुसार ही वाहने भंगारत काढल्यास त्याचावर मोठ्या प्रमाणात फटका खाणग्रस्त भागातील जनतेला बसणार आहे. यामुळे सरकारने किमान पाच मुदतवाढ द्यावी, अशी मागणी परब यांनी केली. त्या संदर्भात विचार करण्याचे आश्वासन यावेळी वाहतूकमंत्र्यांनी दिले. यावेळी सरपंचांनी सरपंच व पंच सभासदांच्या मानधनांमध्ये वाढ करावा,r अशी मागणी केली. स् त्या संदर्भात त्यांनी विचार करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात सरकारची बोलणी झालेली आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
पंचायत क्षेत्राच्या विकासासाठी भरघोस निधी द्या
सत्तरी तालुक्यातील सर्व पंचायतींचे आर्थिक परिस्थिती कमजोर आहे. अशी अवस्थेत संबंधित भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकास कामे घेणे शक्य नाही. यामुळे पंचायतींना भरघोस निधी बहाल करावा, अशी मागणी उपस्थितांनी केली. केली. यावर मंत्री गुदिन्हो यांनी यासंदर्भात आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
भरधाव वाहन चालकांवर कारवाई करा !
दरम्यान, सत्तरी तालुक्यातील विविध सरपंचांनी संबंधित भागांमध्ये बेफिकिर वाहन चालकामुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असतो. असा प्रश्न उपस्थित केला. खास करून केरी चोरला महामार्गावर वाहतुकीमुळे समस्या निर्माण होत असतात .यामुळे सरपंच दीक्षा गावस यांनी केरी भागातून अशा वाहतुकीसाठी बगल मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी केले. होंडा गावकरवाडा या ठिकाणी रात्री मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते अवजड वाहतुकीला बंदी घालावी अशा प्रकारची मागणी संबंधित भागाचे पंच सभासद दीपक गावकर यांनी केली.
पिसुर्ले, नावेलीत लवकरच नवीन कारखाने
सध्या बेरोजगारीची समस्या वाढत आहे. यासाठी सरकारने पिसुर्ले नवीन प्रकल्प उभारण्याला मान्यता दिलेली आहे. त्याचप्रमाणे नावेली साखळी या ठिकाणी टाटाचा नवीन प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी पाचशे कोटी खर्च करण्यात येणार आहे. जवळपास 700 जणांना रोजगार उपलब्ध होणार असून याचाही फायदा सत्तरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना होणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. दरम्यान भिंरोडा सरपंच उदयसिंग राणे यांनी यावेळी पंचायत खात्याने चांगला निधी उपलब्ध करून दिलेले आहे. मार्च महिन्यामध्ये हा निधी उपलब्ध झाल्यामुळे येणाऱ्या काळात पंचायतीच्या विकास कामाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्तरीतील वाहतुकीच्या समस्या सोडवा : डॉ.देविया राणे
माविन गुदिन्हो यांच्या या संवाद कार्यक्रमातून सत्तरी तालुक्यातील पंचायत संदर्भात असलेल्या समस्यांना पूर्णविराम मिळणार आहे. त्यांनी सत्तरी तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. वेगवेगळ्या सरपंचांनी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भा त्यांनी विशेष दखल घ्यावी त्याचप्रमाणे होंडा पर्ये,केरी, या भागांमध्ये असलेल्या वाहतुकी संदर्भाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा , अशी मागणी यावेळी त्यांनी केली. उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय सावंत यांनी केले व त्यांनीच आभार व्यक्त केले.