ऑनलाईन टीम/तरुण भारत
कर्नाटक हिजाब बंदी (Karnataka Hijab Raw) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) खडे बोल सुनावले आहेत. यावेळी हिजाबचा प्रश्न फक्त शाळांमधील बंदीचा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. हिजाब परिधान करण्यासाठी इतर कुठेही बंदी नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. कर्नाटकात शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी घातल्यानंतर विद्यार्थीनींच्या प्रवेशाचा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने ही बंदी उठवण्यास नकार दिला होता. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सध्या सुनावणी करत आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने हिजाब बाबतचा प्रश्न फक्त शाळांमधील बंदीचा आहे, हिजाब इतर कोठेही परिधान करण्यास मनाई नाही असं सुनावणी वेळी म्हटलं आहे. या प्रकरणी ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडत न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाला हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची विनंती केली. त्यांनी असा युक्तिवाद केला की, घटनेच्या कलम 19, 21 किंवा 25 नुसार जर एखाद्या मुलीने तिच्या अधिकारांचा वापर करताना हिजाब घालण्याचा निर्णय घेतला तर सरकार तिच्यावर असे निर्बंध घालू शकते का? ज्यामुळे तिच्या अधिकारांचे उल्लंघन होईल. यावर खंडपीठाने तोंडी टीका केली आणि म्हटले, ‘प्रश्न असा आहे की, तुम्हाला हिजाब घालण्यापासून कोणीही रोखत नाही. तुम्हाला हवे तिथे तो घालता येतो. फक्त शाळेत बंधन आहे. आमचा प्रश्न फक्त शाळेशी संबंधित आहे. असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
हिजाब बंदीविरोधात दाखल करण्यात याचिकेत हे प्रकरण पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावं अशी विनंती करण्यात आली आहे. घटनेच्या कलम १९,२१ किंवा २५ नुसार मुलीला तिच्या अधिकारांचा वापर करत असताना हिजाब घालायचा निर्णय घेतला तर तिच्यावर अशा पद्धतीने निर्बंध कसे घालू शकता असा प्रश्न याचिकेत विचारण्यात आला. खंडपीठाने यावर म्हटलं की, तुम्हाला हिजाब घालण्यापासून कुणीही रोखत नाहीय. तुम्ही हिजाब कुठेही घालू शकता, फक्त शाळेत यावर बंदी आहे. आमचा प्रश्न फक्त शाळेशी संबंधित असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी याचिकाकर्त्याच्या बाजूने वकीलांना दक्षिण आफ्रिकेतील एका प्रकरणाचा संदर्भ दिला. त्यामध्ये मुलीला शाळेत नथ घालायची होती. यावर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती गुप्ता यांनी म्हटलं की, नथ हा कोणत्याही धार्मिक प्रथेचा भाग नाही. जगभरात महिला कानात घालतात, हे धार्मिक प्रथेत नाही. तसंच आपल्या देशात धार्मिक वैविध्य आहे तसं इतर कोणत्या देशात नाही.