ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Scholarships for students from 1st to 8th are cancelled up madrasas उत्तर प्रदेशातील मदरशात शिकणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे यापुढे केवळ 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत 1000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती मिळत होती. मात्र, आता केंद्र सरकारने ही शिष्यवृत्ती रद्द केली आहे.
अधिक वाचा : अखेर बाबा रामदेव यांनी मागितली महिलांची माफी; म्हणाले…
शिक्षण हक्क कायद्यानुसार मदरशांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. तसेच मध्यान्ह भोजन आणि पुस्तकंही मोफत दिली जातात. याशिवाय इतर आवश्यक गोष्टीही विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात. त्यामुळे केंदाने पहिली ते आठवीपर्यंतची शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 वी आणि 10 वी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत कोणताही बदल करण्यात आला नाही.