ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्रात भाजमध्ये खांदेपालट झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईचे भाजप अध्यक्ष म्हणून आशिष शेलार यांची निवड झाली आहे. यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा, तर विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक भाजप-सेना जागा मिळवून बहुमत मिळवण्याकरता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष होण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करणार आहोत.
तर चंद्रकांत पाटील म्हणाले, येणाऱ्य़ा आगामी निवडणूकांमध्ये आतापर्यंत भाजप एक नंबरचा पक्ष राहिला आहे. यापुढेही भाजप एक क्रमांकावर राहील. भाजप सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने आगामी काळात सर्वसामान्य माणसाचा पक्ष राहण्यासाठी प्रयत्न करावा अशा शुभेच्छा देऊन आवाहनही केले.