पाच सत्रांनंतर बाजारात उसळी : रिलायन्स, टीसीएस तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
गेली सलगची सत्रे घसरणीत राहिल्यानंतर अखेर बुधवारी शेअर बाजार तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. सेन्सेक्स 570 अंकांनी वधारला.
भारतीय भांडवली बाजार मागील सत्रांमध्ये घसरणीत राहिला होता, परंतु तो अखेर तिसऱया सत्रात बुधवारी सावरल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय बाजाराचा कल तेजीकडे राहिला होता. बीएसई सेन्सेक्समधील मुख्य कंपन्यांच्या मदतीने रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस, एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागात तेजीचे वारे राहिले होते. जागतिक स्तरावरील कल सकारात्मक राहिला.
दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 574.35 अंकांनी वधारुन निर्देशांक 57,037.50 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 177.90 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,136.55 वर बंद झाला आहे.
जागतिक पातळीवर आशियातील अन्य बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे नुकसानीत राहिले. तर जपानचा निक्की हा लाभात राहिला होता. युरोपमध्ये मुख्य बाजारात तेजीचा कल राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.89 टक्क्यांनी लाभासोबत 108.2 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बँक यांचे समभागात लिलाव झाला. यासोबतच अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचे समभाग लाभात राहिले होते. दुसऱया बाजूला मात्र बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील आणि आयटीसी यांचे समभाग नुकसानीत राहिले होते.