दोन्ही राज्यांदरम्यान करार पूर्ण : केंद्र सरकारची मध्यस्थी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आसाम आणि अऊणाचल प्रदेश यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसाम आणि अऊणाचल प्रदेश सरकारने दोन्ही राज्यांमधील आंतरराज्य सीमा विवाद सोडवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि अऊणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गुऊवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आसाम आणि अऊणाचल प्रदेश यांच्यात 1972 पासून आंतरराज्यीय सीमा विवाद सुरू होता. यात केंद्र सरकारने मध्यस्थी करत वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढला आहे. यासंबंधी करार करण्यात आला आहे. या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाधान व्यक्त केले. आज आपण विकसित, शांततापूर्ण आणि संघर्षमुक्त ईशान्येच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा पार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
करारावर स्वाक्षरी ही मोठी उपलब्धी : शहा
आसाम आणि अऊणाचल प्रदेश यांच्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या आंतरराज्य सीमा विवादाच्या सोडवणुकीसाठी झालेल्या करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. दोन्ही राज्यांमधील आंतरराज्य सीमा विवाद सोडवण्यासाठी करारावर स्वाक्षरी होणे ही एक मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. तसेच आसाम-अऊणाचल प्रदेश सीमा करार ‘ऐतिहासिक’ घटना असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचेही स्पष्टीकरण
आसाम आणि अऊणाचल प्रदेशमध्ये 1972 पासून सीमा विवाद आहे. आज आम्ही सर्व वाद संवादातून सोडवले आहेत. गृहमंत्री शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने हा वाद मिटला असून, तो मैलाचा दगड ठरणार असल्याचे हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. तसेच पेमा खांडू यांनीही सदर कराराचा उल्लेख ‘ऐतिहासिक क्षण’ असा केला आहे.
एक दिवसापूर्वी मंत्रिमंडळाकडून मंजुरी
आसाम मंत्रिमंडळाने बुधवारी (19 एप्रिल) अऊणाचल प्रदेशसोबतच्या अनेक दशकांच्या सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या 12 विभागीय समित्यांनी केलेल्या शिफारशींना मंजुरी दिली. आसाम आणि अऊणाचल प्रदेश यांच्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला सीमावाद तातडीने सोडवला जाणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या निर्णयांची घोषणा करताना आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी जाहीर केले होते.