ऑनलाईन टीम/भारत
उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (Mla Kailas Patil) यांचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेले सहा दिवस सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा केल्यांनतर आमदार पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे बोलले जात आहे. पीक विमासह (Pik Vima) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार पाटील उपोषणास बसले होते.
दरम्यान, पीक विमासह (Pik Vima) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले होते. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली. त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ddevendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा केली. चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे.