घरांवर, वीजवाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे नुकसानी : आंबा, काजू बागायतदारांसह वीज खात्यालाही मोठा फटका
प्रतिनिधी /वाळपई
शनिवारी रात्री सत्तरी तालुक्मयात अनेक भागात वादळी वाऱयासह पाऊस झाला. यामुळे काजू व आंबा उत्पादनाची मोठय़ा प्रमाणात हानी झाली. त्याचप्रमाणे अनेक भागातील वीज वाहिन्यां तुटून वीज खंडित झाली. अद्यापही अनेक गावातील वीजपुरवठा ठप्प आहे. सदर वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी वाळपई वीज कार्यालयाची यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे. तसेच अनेक गावांमध्ये घरावर झाडे कोसळून मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली.
शनिवारी संध्याकाळी सत्तरी तालुक्मयातील अनेक भागात वादळी वाऱयाचा तडाखा बसला. यामध्ये अनेक घरावर झाडे पडल्यामुळे नुकसानी झाली. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुळेली, खोतोडा, नगरगाव, केरी, ठाणे आदी भागांतील घरांवर झाडे पडल्यामुळे नुकसानी झाली. यामुळे संबंधित कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. वादळी वाऱयाचा फटका वीज खात्यालाही बसला असून अनेक ठिकाणी वीज वाहिन्या पूर्णपणे तुटल्या व यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला.
नगरगाव पंचायत क्षेत्रात मोठी हानी
नगरगाव पंचायत क्षेत्रातील आंबेडे, ब्रह्मकरमळी, धावे नगरगाव आदी भागातील वीज वाहिन्याना तुटल्या आहेत. सदर भागातील वीजपुरवठा ठप्प झालेला आहे. आज दिवसभर वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू होते. धावे येथील संतोष भावे यांच्या गुरांच्या गोठय़ाचे पत्रे उडून गेल्यामुळे त्याला नुकसानीला सामोरे जावे लागले. सुमारे पन्नास हजारपेक्षा जास्त नुकसानी झाली असून गोठय़ाचे पत्रे उडून गेल्याचे त्यांनी सांगितले. नगरगाव पंचायत व सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदारांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी संतोष भावे यांनी केली आहे.
या पावसाचा फटका काजू, आंबा उत्पादनाला मोठय़ा प्रमाणात बसला आहे. सातत्याने पडणाऱया पावसाचा फटका विशेषतः बागायतदार शेतकऱयांना बसला आहे. शनिवारी पडलेला पाऊस मात्र अनेकांसाठी नुकसानकारक ठरला. गेल्या दोन महिन्यापासून सत्तरी तालुक्मयात अधून मधून पाऊस पडत आहे. याची झळ नागरिकांना बसत आहे.