शेतकऱयाचे होतेय कौतुक
स्वतःचे घर तोडले जाताना कुणीच पाहू शकत नाही. अशाच एका शेतकऱयाने स्वतःचे घर वाचविण्यासाठी एक अजब शक्कल लढविली आहे. या शेतकऱयाचे घर दिल्ली-जम्मू कटरा द्रूतगती महामार्गाच्या आडवे येत होते. शेतकऱयाने स्वतःचे घर वाचविण्यासाठी ‘जुगाड’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
भारतमाला प्रकल्पाच्या अंतर्गत शेतकऱयांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. शेतकरी सुखविंदर सिंह यांची जमीन देखील याच कक्षेत आहे. त्यांनी शेतातच स्वतःचे घर तयार केले आहे. 1.25 कोटी रुपये खर्चुन 2019 मध्ये त्यांनी हे घर तयार केले होते. हे घर उभारण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले होते आणि यासाठी मोठी रक्कमही खर्च केली होती.
सुखविंदर यांनी लिफ्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करत घराला 250 फुटांहून अधिक अंतरापर्यंत हलविले आहे. तंत्रज्ञांना असे करण्यासाठी सुमारे 2 महिन्यांचा कालावधी लागला आहे. घराला आणखी 250 फूट सरकवावे लागणार आहे, त्यानंतर 60 फुटांपर्यंत घर दुसऱया बाजूला वळवावे लागणार आहे. या सर्व प्रक्रियेत सुखविंदर यांना 40 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. घराला शिफ्ट करणाऱया लोकांसाठी हे एक अत्यंत मोठे आव्हान होते. दररोज घर 10 फूट नेण्यात येते.
तोडण्यापासून वाचले घर
ही प्रक्रिया गाडी उचलणाऱया जॅकच्या (मोठय़ा आकाराचा) मदतीने केली जाते. लिफ्टिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने या शेतकऱयाने स्वतःचे घर तोडले जाण्यापासून वाचविले आहे. परंतु या कामात मोठा कालावधी लागला असला तरीही कुणाला नुकसान न पोहोचविता शेतकऱयाची इच्छा पूर्ण झाली आहे.