मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा 9 नोव्हेंबर रोजी कर्नाटकातून महाराष्ट्रात पोहोचत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे हे ऱाष्ट्रवादीचे दोन्ही नेते राहुल गांधी यांच्या स्वागतास उपस्थित राहणार आहेत. याची माहिती राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
या संदर्भात बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारत जोडो यात्रेचे स्वागत करण्याची ईच्छा व्यक्त केली. 9 नोव्हेंबरला ही यात्रा कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना ते स्वागत करतील.” असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. जेष्ठ नेते शरद पवारांच्या यांच्या सहभागाने विरोधी पक्षांमध्ये एकजूटीचा संदेश देण्यात मदत होईल.
भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात हि यात्रा नांदेड, जळगाव आणि जामोद या मार्गाने मध्यप्रदेशात जाईल. एकुण १६ दिवस महाराष्ट्रात असलेल्या या यात्रेमध्ये राहूल गांधी ३८० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही यात्रा महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यातून जाईल. या यात्रेदरम्यान कमीत कमी १० ठिकाणी राहूल गांधींच्या सभा होणार आहेत.