वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मूल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांचा तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे दिसून आले. आठवडय़ाच्या अंतिम दिवशीच्या कामगिरीत कंपनीचे समभाग जवळपास तीन टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासोबत मुकेश अंबांनी यांच्या रिलायन्सचे बाजारमूल्य पुन्हा एकदा 19 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.
शेअर बाजारात ट्रेडिंगच्या दरम्यान समभागाचा भाव 2,816.35 रुपयांपर्यंत कार्यरत राहिला होता, जो 52 व्या आठवडय़ातही उच्चांकी पातळीच्या काहीसा कमी आहे. रिलायन्सचे समभाग 24 एप्रिल 2022 रोजी 2,855 रुपयांवर पोहचले असून जो 52 व्या आठवडय़ात उच्चांकी पातळीवर राहिला आहे. मागील दोन आठवडय़ात कंपनीचे समभाग 14 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत.