काँग्रेस अध्यक्षपदी निवडून देण्याचे व्हिडीओतून आवाहन
खार्किव्ह / वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले पक्षाचे नेते शशी थरुर यांनी शनिवारी एका व्हिडीओ संदेशाद्वारे आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या एक-दोन दिवसात थरुर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर आता स्वतः थरुर यांनीच ‘मी आव्हानापासून दूर जात नाही. मी आजपर्यंत कधी माघार घेतलेली नाही आणि यापुढे घेणारही नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींच्या माध्यमातून पक्षाच्या काही नेत्यांनी शशी थरूर यांची उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते, मात्र राहुल गांधींनी तसे काहीही केले नसल्याचे स्पष्टीकरणही शशी थरुर यांनी दिले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या लढाईत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर आमने-सामने आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शनिवारी दुपारी 3 वाजता संपली. या मुदतीपर्यंत थरुर यांनी माघार न घेतल्याने आता खर्गे आणि थरुर यांच्यात थेट लढत रंगणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 19 ऑक्टोबर रोजी काँग्रेस मुख्यालयात मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीअंती विजयी उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.
शशी थरुर आपली उमेदवारी मागे घेतील अशी शक्मयता वर्तवली जात होती. मात्र, शनिवारी आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला. ‘मी आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे ऐकले आहे. पण, मी तुम्हाला खात्री देतो की मी कधीही आव्हान सोडणार नाही. मी कधीही मागे हटणार नाही. माझ्या संपूर्ण आयुष्यात हा संघर्ष आहे, पक्षांतर्गत मैत्रीपूर्ण लढा आहे. पण लढा शेवटपर्यंत सुरू ठेवायचा आहे’ असा संदेश त्यांनी व्हिडीओमधून जारी केला. तसेच, ‘कृपया, 17 तारखेला मला मतदान करा. तुम्हाला उद्याचा विचार करायचा असेल, तर थरूर यांना नक्कीच लक्षात ठेवा’ असेही ते पुढे म्हणाले.
खर्गेंना अधिक पसंती
मल्लिकार्जुन खर्गे यांना उमेदवारी दिल्याने अध्यक्षपदाचा कौल त्यांच्या बाजूने लागण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. खर्गे हे काँग्रेसचे ज्ये÷ नेते असून प्रत्येकजण त्यांचा आदर करतो. त्याचवेळी पक्षातील असंतुष्ट कॅम्प जी-23 देखील खर्गे यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ उभी आहे. अशा स्थितीत जी-23 गटातील सदस्य आणि खर्गे यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांच्यासाठी हा सामना जिंकणे दूरचे स्वप्न आहे, अशी चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मते मागण्यासाठी शशी थरूर यांनी अनेक राज्यांना भेटी दिल्या आहेत. पण, नेत्यांकडून त्यांना तेवढा पाठिंबा मिळत नसल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. याउलट खर्गे यांना गांधी घराण्याच्या पाठिंब्यानंतर पक्षश्रे÷ाrंकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे.