बेळगाव – सुळगा गावातील यल्लाप्पा भरमा नरोटी, मल्लाप्पा कलप्पा नरोट यांनी यल्लाप्पा मरेयप्पा उजगावकर यांच्या बकऱ्याच्या कळपांवर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला करून शेळ्या व कोकरांचा फडशा पडला. या हल्ल्यात बारा मेंढ्या मृत्युमुखी पडल्या तर सात कोकरे बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव तालुक्यातील सुळगा हिंडलगा गावात घडली आहे . भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला करून मेंढ्याना ठार केले. या भीतीने इतर मेंढ्या घाबरून वेगवेगळ्या दिशेने पडू लागल्या, यावेळी काहींनी बेनकनहळ्ळी गावात मेंढ्या अडवून मालकाला कळविले. नंतर मालकाने बेनकनहळ्ळी येथे धाव घेऊन मेंढ्या ताब्यात घेतल्या. या घटनेमुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे . शासनाने त्या मेंढपाळाला योग्य ते नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती केली आहे.
Previous Articleधुळ्यात मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट
Next Article हुबळी जवळ बर्निंग ट्रॅव्हल्सचा थरार