ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात न्यायालयात अपात्रतेचा खटला सुरू आहे. कायद्यानुसार हे आमदार अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार सध्या व्हेंटिलेटवर आहे. हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा पुनरूच्चार खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नाशिकमध्ये बोलताना केला.
राऊत म्हणाले, शिवसेना एकच असून, महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत. शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेचा खटला सुरू आहे. संविधान, घटना आणि कायदा देशात आहे. न्यायव्यवस्थेवर कोणताही दबाव आला नाही तर निकाल आमच्या बाजूने लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, यावर मी आजही ठाम आहे.
अधिक वाचा : ‘भारत जोडो’नंतर काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान
या सरकारमध्ये दोन गट पडलेले आहेत. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो, असं सुरू आहे. 40 आमदारांच्या पलीकडे त्यांचे सरकार नाही. 40 आमदारांची ख्याली खुशाली, त्यांना खुश करणं एवढंच सुरु आहे. मात्र्। महाराष्ट्रात राजकीय वातावरण एका परिवर्तनाच्या दिशेने चालले असून, 2024 ची तयारी सुरू आहे. पण त्याच्याआधीही परिवर्तन होऊ शकेल.