कोल्हापूर- आजरा तालुक्यातील सिरसंगी येथे हत्तीने पुन्हा मोर्चा वळवला असून पाण्याची सेंटेक्स टाकी व शेततळ्यातील पाण्याची टी जम्प फोडून नुकसान केले आहे. यामुळे शेतकर्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हजगोळी मलिग्रे जंगलात ठाण मांडून बसलेल्या हत्तीने आता सिरसंगी परिसराकडे मोर्चा वळवला आहे.
गेल्या तीन वर्षापासून ऑक्टबर ते डिसेंबर महिन्यात फेरफटका मारणारा हत्ती अचानक जून महिन्यातच आल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.संतराम गोपाळ पाटील यांच्या घोलाच्या नावाच्या शेतातील शेतातशेजरील पाण्याची टाकी फोडून व पाईपांचे नुकसान केले आहे.जंगलात काम करणाऱ्या मजुरांनी डबे वाजवल्यामुळे हत्ती पुन्हा जंगलात गेला. गवा प्रण्याबरोबर आता हत्तींचा वावर वाढला असून वनविभागाने त्वरित हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.