ऑनलाईन टीम/तरुण भारत
सीमा भागातील मराठी बांधव एक नोव्हेंबर रोजी बेळगाव मध्ये काळा दिवस पाळतात. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) कोल्हापुरातून मशाल घेऊन बेळगावकडे रवाना झाली आहे. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्र पोलीस आणि कर्नाटक पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शिवसेनेला बेळगावमध्ये जाण्यास कर्नाटक पोलिसांनी मनाई केली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही मशाल घेऊन बेळगाव मध्ये दाखल होणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.