ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सध्याची शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या पिंजऱ्यातील मांजर आहे, अशी बोचरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज प्रथमच गोरेगाव येथील नेस्को संकुलावर गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करत आहेत. त्या मेळाव्यावरुन देशपांडे यांनी ही टीका केली आहे.
देशपांडे म्हणाले, शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजऱ्यातील मांजर झाली आहे. उद्धव ठाकरेंनी कितीही मेळावे घेतले तरी त्याचा काही उपयोग नाही. कारण मुळातच त्यांच्याकडे विचार नाहीत. शिवसेनेच्या औरंगाबादमधील नेतृत्वाबद्दल बोलताना ते म्हणाले, शिवसेनेचे औरंगाबादमधील नेतृत्व हे आऊटडेटेड झालं आहे. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन्ही नेते आता आऊटडेटेड आहेत.
अधिक वाचा : बाळासाहेबांची टीका आम्ही दिलदारपणे घ्यायचो, दसरा मेळाव्यावरून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मनसेवर टीका करणाऱया जयंत पाटलांनी शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस संपवत आहे, यावर बोलावं, असा टोला लगावला. दरम्यान, नेस्को संकुलावर होत असलेल्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकणार असल्याचे संकेत आहेत.