ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उद्धव ठाकरे आणि आमच्यात दरी पडण्यास खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विनायक राऊत (Vinayak Raut) जबाबदार आहेत. या दोन नेत्यांमुळेच शिवसेनेचे 40 आमदार फुटले. यासाठी आणखी दोन-तीन नेते कारणीभूत आहेत, असे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu patil) यांनी म्हटले आहे.
शहाजीबापू म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंधेरी पूर्वची जागा भाजपला सोडली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे मुरजी पटेल हे अंधेरीची पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यांचे त्या मतदारसंघात काम चांगले आहे. मागील निवडणुकीतही त्यांना चांगली मतं पडली होती. त्यामुळे ही जागा भाजपला देण्यात आली. सध्या राज्याच्या राजकारणात वेगवेगळय़ा प्रकारची गणितं चालू झाली आहेत, आगामी काळात अजूनही वेगवेगळी गणितं आणि आराखडे बघायला मिळतील. दरम्यान, या निवडणुकीत पटेल नक्की विजयी होतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा : भाजप उमेदवाराविरोधात ठाकरे गटाचा आक्षेप, उमेदवारी रद्द करण्याची मागणी
येत्या काळात मनसे, भाजप आणि शिंदे गट यांच्यात युती होण्याची शक्यता आहे का, याबाबत विचारले असता ते म्हणाले, आगामी काळात भाजप-मनसे-शिंदेगट अशी युती नक्की होऊ शकते. राज्याच्या हितासाठी आणि कल्याणासाठी ही युती होणे गरजेचे आहे.