ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्यासाठी हा सर्वात कठीण प्रसंग आहे. आपण आता जागे झालो नाही तर 2024 मध्ये हुकुमशाही येईल. भाजपचे तळवे चाटण्यासाठी आपला जन्म झालेला नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षातील नेत्यांना उद्देशून केले.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षातील नेत्यांची आज बैठक झाली. यावेळी ते म्हणाले, मिंधे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले. कालांतराने त्यांच्यावरील जुन्या केसेस उघडणार आणि संपूर्ण शिवसेना संपवायचा भाजपचा प्लॅन आहे. 28 तारखेपर्यंत मशाल हे चिन्ह आपण वापरू शकतो, हे चिन्ह जरी काढून घेतले तर अजून दहा चिन्हे माझ्या मनात आहेत.
अधिक वाचा : बघितलंस आनंदा…आपल्या एकनाथाने गहाण असलेला धनुष्यबाण सोडवला
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेना टिकणार नाही असं बोललं जात होते. पण आपण जिंकलो. सध्या आपल्यासाठी कठीण प्रसंग आहे. आपण आत्ताच जागे झालो नाही तर 2024 मध्ये हुकूमशाही येईल. भाजपच तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही.