ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. यातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने मोठी राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला. यांनतर लगेचच बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने ही खेळी केल्याची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेनं (Shivsena) भाजपाला धक्का देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिंदे सरकारविरोधात शिवसेनेनं थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी याचिका दाखल केली आहे. मात्र, यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येत्या ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं असून त्यामध्ये राज्य सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून बहुमत चचनू पुढे ढकलावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
हेही वाचा : ‘केंद्राने देवेंद्र फडणवीसांचा शंकरराव चव्हाण केला’; प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्वीट