सुरत-शिवसेनेच्या आमदारांनी कोणतेही बंड केलेले नाही. त्यांनी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार यापासून आमदार फारकत घेणार नाहीत. अशी बंडानंतर पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे (eknath shinde) दिली आहे. शिवाय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब यांचा हिंदुत्वाचा नारा पुढे घेऊन जाणार, गर्व से कहो हम हिंदू हे असे देखील शिंदे म्हणाले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावर कोणतेही तडजोड करणार नाही. असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल मधून बाहेर काढून त्यांना सुरत विमानतळावर आणले आहे. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी चोवीस तासानंतर माध्यमांशी संवाद साधला. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोणत्याही आमदारांनी फारकत घेतली नाही. सत्तेसाठी नव्हे तर बाळासाहेबांचे कडवट हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहे. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. शिवसेना सोडलेली नाही,यापुढेही सोडणार नाही. पण बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते घेऊन आम्ही पुढचे राजकारण व समाजकारण करणार आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिलेला आहे यात कोणतेही तडजोड करणार नाही. असे शिंदे म्हणालेत.
भाजप सोबत सत्तेत राहावे: शिवसेना आमदार
एकनाथ शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांना सुरत विमानतळावर घेऊन आले असता आमदार सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढं जायची गरज असून शिवसेनेने आता भाजप सोबत सत्तेत राहावे, अशी प्रतिक्रिय दिली आहे.