पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा : गर्दीच्या ठिकाणी अपघात रोखण्याचे आव्हान
कोल्हापूर : संतोष पाटील
मुंबई-पुणे-नाशिकनंतर नागरिकरणाच्या स्पर्धेत असणाऱया कोल्हापूर शहरात लोकसंख्येबरोबरच हजारो वाहनांचीही भर पडत आहे. दिवसेंदिवस शहरातील वाहतुक व्यवस्थाही बिघडत असल्याचे चित्र आहे. 15 मे 2017 रोजी ट्रकचालकाने थेट भवानी मंडपात ट्रक घुसविला. ऑक्टोबर 2017 मध्ये पापाची तिकटी येथे ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएसटीचा अपघात झाला. 24 मे 2017 रोजी उमा टॉकिज चौकात एसटीने वाहनांना चिरडले. यातून यंत्रणेने कोणताही बोध घेतला नसल्याचे सीबीएस येथील बुधवारच्या शिवशाही बस अपघातावरुन स्पष्ट होते. संपानंतर एसटी बसेसची सेवा सुरु झाल्यानंतर शिवशाहीची अपघातांची मालिका पुन्हा सुरू झाली काय? अशी भिती या निमत्ताने व्यक्त केली जात आहे.
पुण्यात 25 जानेवारी 2012 ला चालकाने पादचाऱयांना चिरडल्याच्या घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाने विविध उपाययोजना जाहीर केल्या. यामध्ये चालकाच्या दर काही महिन्यांनी मानसिक व शारिरीक तपासणीसह समुपदेश करण्याचे ठरले होते. यानंतरही कोल्हापुरात 24 मे 2017 रोजी एसटीने वाहनधारकांना चिरडुन पुण्याची पुनवृत्ती केली होती. तत्पूर्वी भवानी मंडपातही ट्रक घुसला. त्यानंतर चार महिन्यातच पापाची तिकटी येथे ब्रेक फेल झाल्याने ताबूत विसर्जन मिरवणुकीत पापाची तिकटी येथे बस घुसल्याने दोन ठार झाले होते.
एस. टी. महामंडळाने चालकाची शारिरीक व मानसिक तपसाणी करुन बस अधिक सुरक्षित कशी होईल, याची योजना आखली. त्यानंतर राज्यातील 41 हजार चालकांची तत्काळ तपासणी करण्यात आली. रक्तदाब, ह्रदयविकार, मधूमेह असणाया चालकांची नियमित तपासणी करण्याचे ठरले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पाच महिन्याहून अधिककाळ बससेवा बंद होती. चालकांच्या मानसिक तपासणी सोबतच आता सर्वच बसेसची तांत्रिक तपासणी करण्याची गरज सीबीएस येथील अपघातानंतर प्रकर्षाने पुढे आली आहे.
शहर वाहतूक व्यवस्था सुरक्षित कधी होणार?
शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनले आहेत. बेदरकारपणे जाणाऱया वाहनांचीही डोकेदुखी आहे. शहरात विनापरवाना प्रवाशी वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिचून सुरू आहे. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ कश्याही पार्कींग केलेल्या लक्झरी गाडय़ांनी मुख्य चौकातील पार्कींग व्यवस्था मोडकळीस आणली आहे.सार्वजनिक व खासगी पार्कींगची सोय पुरेशी नसल्याने एकाचवेळी किमान एक लाखाहून अधिक वाहने रस्त्यांवरच असतात. शहराला बायपास रोड किंवा शहराबाहेर जाण्यासाठी उड्डाणपुल नसल्याने कोकणात जाणारी व शहरात येणाऱ्या अवझड वाहनांचा शहरातून प्रवास होतो. त्यामुळे या सर्वांवर योग्य उपायोजना करण्याची गरज आहे.
शिवशाहीची अपघातांची मालिका
एसटी महामंडळाने जून 2017 मध्ये शिवशाही या वातानुका†लत बस सुरू केल्या. यात स्वमालकीच्या आा†ण भाडेतत्त्वावरील बसचा समावेश होता. प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर शिवशाहीला प्रथम अपघातांनी गालबोट लागले. एसटी महामंडळात दाखल झालेली ही बस त्याच्या सुविधांपेक्षा अपघातांमुळेच जास्त चर्चेत आहे. साडेपाच वर्षापूर्वी शिवशाही बस सेवेत आल्यापासून होत असलेल्या अपघातांचे सत्र थांबलेले नाही. 2021 साली शिवशाहीचे 131 अपघात झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 126 जखमी झाले आहेत. एा†प्रल 2018 ते मार्च 2019 मध्ये शिवशाहीचे सुमारे 221 अपघात झाले. त्याआधीच्या वर्षी ही संख्या 240 होती. सध्या एसटीच्या ताफ्यात मालकीच्या 900 बस आणि भाडेतत्वावरील 400 बस आहेत. संपामुळे यातील बहूसंख्य गाडय़ा थांबून होत्या, बसेसची शास्त्रीय तांत्रिक चाचणी करण्याची गरज आहे.
17 ऑक्टोबर 2017 ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी घुसली
15 मे 2017 रोजी एक ट्रकचालकाने थेट भवानी मंडपात ट्रक घुसविला.
24 मे 2017 रोजी उमा टॉकिज चौकात एसटीने वाहनांना चिरडले.
27 मार्च 2022 रोजी सीबीएस येथे शिवशाहीचा ब्रेक निकामी होवून वाहने गाडीखाली.