तालुका विकास आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्मयात युरिया खताची टंचाई तसेच चढय़ा दराने विक्री करण्यात येत आहे. येथील खत व्यापारी शेतकऱयांची लुबाडणूक करत आहेत. याची दखल शासनाने तातडीने घेऊन युरिया खताची टंचाई दूर करावी व चढय़ा दराने विक्री करणाऱया दुकानदारांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. येत्या दोन दिवसात खताची टंचाई दूर न झाल्यास तालुका विकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
हे निवेदन खानापूर तालुका विकास आघाडीच्या वतीने सोमवारी तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत निश्चित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी भरमाणी पाटील, शिवाजी आंबेवाडकर, नागेश बाळेकुंद्री, हनुमान खांबले, श्रीनिवास मादर, ईराप्पा पाटील, सुजल हलगेकर, रवी पाटील, राजेंद्र पाटील यासह शेतकरी उपस्थित होते.