चार एकर वाचवण्यात यश
कासेगाव वार्ताहर
वाळवा तालुक्यातील भाटवाडी येथे विद्युत वाहक तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन आठ एकर ऊस जळून खाक झाला असून सबंधित शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चार एकर ऊस वाचवण्यात यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भाटवाडी येथील दंड भाग रस्त्यालगत यंदा कारखान्यास जाणाऱ्या ऊसाची शेती असून येथून जाणाऱ्या विद्युत तारांचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन शिवाजी बाबा काळे, संभाजी निवृत्ती यादव, संजय निवृत्ती यादव, आनंदा हिंदुराव बागट, नंदा दिनकर बागट, लक्ष्मी महादेव उथळे, राजेंद्र जितेंद्र उथळे, सुरेश सुबराव जाधव, नारायण ज्ञानू गुंड या सर्वांचे मिळून सुमारे ८ एकर ऊस जळून खाक झाला असून ग्रामस्थांच्या मदतीने ४ एकर ऊस आगीपासून वाचवण्यात यश आले आहे.
रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किरण उथळे, सरपंच नेताजी चव्हाण, मा. उपसरपंच काशिलिंग तिवले, मा. उपसरपंच भाऊसो गुंड, अखिल ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष सुहास साळुंखे, दिनकर उथळे, संभाजी यादव, संजय यादव, पिंटू औताडे, पवन पवार, छगन देवकर, संतोष गणपते, महादेव काळे, भिमराव उथळे, शिवाजी उथळे, जितेंद्र निकम, राहुल बागट, तानाजी बागट, धनाजी बागट, सुरेश डंगारणे, सयाजी निकम, रमेश निकम, आनंदा बागट, रोहित यादव, शुभम यादव, रोशन यादव, अक्षय रोकडे, सिद्धेश यादव, उत्कर्ष रोकडे, अर्जुन पवार यांनी शर्तीचे प्रयत्न करून न जळालेल्या ऊसाच्या बाजूने भांगा पाडून आग आटोक्यात आणली.
महावितरण कंपनीचे कनिष्ट अभियंता शर्वरी शिंदे, लाईनमन नरेंद्र परदेशी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जळीतग्रस्त शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.