श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानील विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी घोषित केली आहे. तसेच पश्चिमेकडच्या प्रदेशात तात्काळ प्रभावानं जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान श्रीलंकेत दंगल भडकावणारे लोक आढळल्यास त्यांना अटक करण्यात यावेत असे आदेश सुरक्षा दलांना दिले आहेत. मागील काही दिवसात देशात महागाई गगनाला भिडली असून लोक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलने केली. त्यांनतर हा निर्णय घेण्यात आला आहे.