माणगावच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाचे पाऊल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकरा लाख टन काजू बोंडांचे उत्पादन होते .त्यातील निम्म्यापेक्षा अधिक काजू बोडु वाया जातो . या वाया जाणाऱ्या काजू बोंडावर डॉ. बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव यांच्यातर्फे पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉक्टर जे .बी. जोशी यांच्यामार्फत संशोधन करण्यात आले .वाया जाणारा काजुबोंडू बुर्मा ड्रायर तंत्रज्ञानाने वाळवून त्याच्यापासून खाद्यपदार्थाला लागणारे रंग औषध आणि इथेनॉल निर्मिती करण्याचा प्रकल्प लवकरात सुरू करण्यात येणार आहे सुमारे 70 कोटी चा हा प्रकल्प असणार आहे या माध्यमातून सिंधुदुर्गात मोठी क्रांती होणार आहे.
माणगाव येथील हेडगेवार प्रकल्पांतर्गत फळ प्रक्रिया आणि शेती संदर्भात विविध उपक्रम राबवण्यात येतात फळ प्रक्रिया सुरू करणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक म्हणून तयार करण्यात येते आतापर्यंत शंभरहून उद्योजक या प्रकल्पातून प्रशिक्षण घेऊन गेलेले तरुण झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाख टन काजू बी चे उत्पादन होते तर 11 लाख टन काजू बोंडाचे उत्पादन होते त्यातील काही काजू बंडू मध्य निर्मितीसाठी गोव्यात जातो परंतु बहुसंख्या काजू बोंडे वाया जातात याबाबत डॉक्टर हेडगेवार सेवा प्रकल्पाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जे बी जोशी यांच्या सहकार्याने संशोधन केले जोशी यांचे दोन शिष्य विक्रमादित्य शिरसाठ क्षितिजा राव यांनी याबाबत अधिक सखोल संशोधन केले त्या अंतर्गत प्रकल्पाच्या ठिकाणी फळ प्रक्रिया करण्यात येणाऱ्या ठिकाणी बॉयलर उभारण्यात आले आहेत .
या बॉयलर मधून गरम हवा आणि धूर निघतो हा दूर वगळून गरम हवा उभारण्यात आलेल्या बुर्मा ड्रायरच्या ठिकाणी वळवून त्या ठिकाणी काजू बोंडे वाळवून त्यापासून खाद्यपदार्थासाठ लागणारे रंग औषध तसेच इथेनॉल इंधन निर्माण करण्यात आले आहे प्रायोगिक तत्त्वावर 500 किलोचा हा प्रकल्प आहे भविष्यात अशा पद्धतीचे दहा प्रकल्प उदाहरण जवळ जवळ पाचशे टन काजू बोंड वाळवून त्यापासून खाद्यपदार्थासाठी रंग औषध इथेनॉल इंधन निर्मिती करण्यात येणार आहे सुमारे 70 कोटीचा हा प्रकल्प असणार आहे त्यामुळे. सिंधुदुर्गात मोठी आर्थिक क्रांती होणार आहे या पद्धतीने कोकणाल उत्पादित होणाऱ्या कोकम, सुपारी, मिरची उत्पादनाचे पावसामुळे होणारे नुकसान टाळता येणार आहे बुर्मा ड्रायर मध्ये वाळवले जाणार आहे आणि होणारे नुकसान टाळता येणार आहे हा प्रकल्प म्हणजे सिंधुदुर्गासाठीच नाहीतर रत्नागिरी चंदगड आजरा गोवा भागालाही वरदान ठरणार आहे बुर्माड्रायर पद्धतीत 50 डिग्री पर्यंतच्या तापमानात फळे वाळवता येणार आहे या संदर्भातील माहिती डॉक्टर बाबासाहेब लेले स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील उकडवे यांनी दिली यावेळी प्रकल्पाचे विश्वस्त अभय पंडित तसेच हेमंत खानोलकर उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी