पुणे / प्रतिनिधी :
देशाच्या अर्थव्यवस्थेत सहकाराचे योगदान अनन्यसाधारण आहे. ग्रामीण अर्थकारणाचा चेहरा असलेल्या सहकारापुढील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी शुक्रवारी येथे दिली. ज्यांनी आपल्या राजकारणासाठी सहकार चळवळ वापरली, तेच आज सहकारात राजकारण नको म्हणतात, अशा शब्दांत नाव न घेता त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकास्त्रही सोडले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरात आयोजित सहकार परिषदेत त्या बोलत होत्या. सीतारामन म्हणाल्या, सहकार मंदिरासमान आहे आणि त्यात पक्षीय राजकारण आणता कामा नये, असे सहकारातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितल्याकडे लक्ष वेधत बारामतीत येऊन मी हा उल्लेख कोणाबाबत करते आहे, हे आपल्याला समजलेच असेल, असे सांगत सीतारामन यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. ज्यांनी आपल्या राजकारणासाठी सहकार चळवळ वापरली. त्यांनी असे म्हणावे म्हणजे काय, अशा शब्दांत त्यांनी या मुद्दय़ावर नाव न घेता पवार यांची खिल्ली उडवली. राजकारणाच्या दुरुपयोगामुळे सामान्यांचे भले झाले नाही, असेही त्यांनी सुनावले.
अधिक वाचा : कोल्हापूर भाजपमध्ये अंतर्गत वाद? महिला पदाधिकाऱ्यांची चंद्रकांत पाटलांकडे तक्रार
सरकाराप्रमाणेच सहकार विभागालाही थेट पोर्टलद्वारे खरेदीची परवानगी उपलब्ध करून देण्यात आली आहे, निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पारदर्शकपणे करण्याची योजना आहे. संगणकीकरणासाठी 2516 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, प्रशिक्षण व पूरक बाबींसाठीही तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, वासुदेव काळे, गणेश भेगडे, चंद्रराव तावरे, रंजन तावरे, पांडुरंग कचरे, बाळासाहेब गावडे, सतीश फाळके आदी यावेळीउपस्थित होते.