जिल्हय़ातील चित्र; लम्पीच्या पार्श्वभूमीवर जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करा; प्रशासनाच्या साखर कारखान्यांना सूचना
धीरज बरगे कोल्हापूर
आगामी गाळप हंगामात जिल्हय़ात ऊस वाहतुकीसाठी परजिल्हय़ातून बैलांसह अन्य अशी एकूण साडेसहा हजार जनावरे दाखल होणार आहेत. त्यामुळे लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्हय़ात येणाऱया जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करुन घेण्याबाबत संबंधित कारखान्यांनी ऊस वाहतूक टोळय़ांना सूचना कराव्यात. येताना लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे. लसीकरण होवून पंधरा दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे, अशा सूचना प्रशासनाने साखर कारखान्यांना दिल्या आहेत.
राज्यातील ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत नुकताच झाला. यामुळे प्रशासन आणि साखर कारखाने यांच्याकडून हंगाम सुरु करण्याची तयारी सुरु आहे. हंगामात ऊस वाहतुकीसाठी ट्रक, ट्रक्टर ट्रॉली, बैलगाडी यांच्या वापर केला जातो. मात्र देशभरात ओढावलेल्या लम्पी स्कीनच्या प्रादूर्भावामुळे जनावरांच्या निर्यातीवर प्रशासनाने बंदी घातली आहे. या निर्णयामुळे हंगामात बैलगाडीतून ऊस वाहतूक करणाऱया टोळय़ावर संकट उभे राहिले होते. मात्र प्रशासनाने जनावरांचे लसीकरण करुन वाहतुकीला परवानगी दिल्याने टोळय़ांना दिलासा मिळाला आहे.
ऊस टोळय़ांनी आत्ताच लसीकरण करावे
जिल्हय़ात येणाऱया जनावरांना संबंधित टोळय़ांनी आत्ताच लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात या टोळ्य़ा दाखल होतील. जनावरांना लस दिल्यानंतर 15 दिवस रिऍक्शनचा कालावधी आहे. त्यामुळे दाखल होताना जनावरांचे लसीकरण पूर्ण होवून पंधरा दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. जिल्हय़ातील गाळप हंगाम सुरु होण्यास अद्यापही वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे ऊस टोळय़ांनी सध्या असणाऱया ठिकाणीच पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अन्यथा पंधरा दिवस क्वारंटाईन
जिल्हय़ात येणाऱ्या जनावरांच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहिले जाणार आहे. लसीकरण केले नसल्यास संबंधित जनावराचे लसीकरण करुन पंधरा दिवस क्वारंटाईन करण्यात येईल. यानंतर ऊस वाहतुकीला परवानगी देण्यात येणार आहे.
या जिल्हय़ातून येणार ऊस वाहतुक टोळ्य़ा
जिल्हय़ातील दहा साखर कारखान्यांकडून बैलगाडीच्या माध्यामातून ऊस वाहतुक केली जाणार आहे. बीड, जालना, नंदूरबार, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, विजापूर, परभणी, जळगांव, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर आदी जिल्हय़ातून ऊस टोळय़ा कोल्हापुरात दाखल होणार आहेत.
साखर कारखान्यांना आवश्यक त्या सूचना
ऊस वाहतुकीसाठी जिल्हय़ात दाखल होणाऱया पशुधनाच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून संबंधित साखर कारखान्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. तसेच कारखान्याच्या ठिकाणी ऊस वाहतुक टोळय़ा आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणूय कारखाना स्तरावर एक पदवीधर पशुवैद्यक व आवश्यकतेनुसार पदवीकाधारक कर्मचाऱयांची नियुक्ती करण्याचीही सूचना केली आहे. –सदाशिव जाधव, साखर सहसंचालक.
साखर कारखाना प्रशासनाला मार्गदर्शन
लम्पी स्कीनच्या प्रादूर्भावापासून पशुधनाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित साखर कारखाना प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले आहे. तसेच जिल्हय़ात येणाऱया पशुधनाच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासले जाणार आहे. लसीकरण न केल्यास संबंधित पशुधनाचे लसीकरण करुन पंधरा दिवस क्वारंटाईन केले जाईल.
- डॉ. वाय. ए. पठाण, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त. ऊस वाहतुकीसाठी जिल्हय़ात दाखल होणाऱया जनावरांची संख्या अशी :
कारखाना जनावरांची संख्या
बैल इतर एकूण
जवाहर शेतकरी, हुपरी 740 880 1620
दत्त शेतकरी, शिरोळ 964 460 142
शरद कारखाना, नरंदे 750 310 1060
शाहू कारखाना, कागल 392 556 948
राजराम, कसबा बावडा 606 92 698
रेणुका शुगर्स, इचलकरंजी 244 50 294
भोगावती, परिते 130 – 130
तात्यासोहब कोरे, वारणानगर 160 30 190
कुंभी-कासारी, कुडीत्रे 50 12 62
दालमिया शुगर्स, आसुर्ले-पोर्ले 80 15 92
एकूण 4116 1539 6518