शस्त्रतस्करी करणारी टोळी गजाआड ः स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्वातंत्र्यदिन सोहळय़ापूर्वी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत शुक्रवारी एका शस्त्रतस्करी करणाऱया टोळीला गजाआड केले. पोलिसांनी एका विशेष मोहिमेदरम्यान सहा जणांना अटक करत त्यांच्याकडून सुमारे सव्वादोन हजार जिवंत काडतुसे जप्त केली. प्रथमदर्शनी सदर शस्त्रतस्कर एका नेटवर्कचा भाग असल्याचे स्पष्ट झाले असले तरी या कारवाईचा दहशतवादी दृष्टिकोनातून तपास केला जात असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व परिक्षेत्र) विक्रमजीत सिंग यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी आनंद विहार परिसरातून शस्त्र तस्करी करणाऱया टोळीच्या 6 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या सहा जणांपैकी रशीद आणि अजमल या दोघांची ओळख पटली आहे. एका रिक्षाचालकाने या दोघांबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण 2,251 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आम्हाला 6 ऑगस्ट रोजी आनंद विहार रेल्वे स्थानकावर दोन व्यक्तींना खाली उतरवणाऱया ऑटोचालकाकडून याबाबतची माहिती मिळाली होती, असे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी एक जण डेहराडूनचा असून तो एका गन हाऊसचा मालक असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
दिल्लीत अलर्ट जारी
15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाने दिल्लीत अलर्ट जारी केला आहे. आयबीने दिल्ली पोलिसांना दहा पानी अहवाल सादर केला असून त्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दहशतवादी हल्ला होण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने दोन्ही दहशतवादी संघटनांच्या नेत्यांना हल्ले करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही गुप्तचर विभागाने स्पष्ट केल्यामुळे शहरातील सुरक्षा अधिक सुसज्ज करण्यात आली आहे.