भिंतीचा भाग हटवून गाळे खुले करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
आझमनगर स्वच्छता कामगार वसाहतींमध्ये गाळय़ांची उभारणी करून ते भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. मात्र संरक्षक भिंतीमुळे हे गाळे बंदिस्त झाले असून ते गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडाले आहे. गाळय़ांची दुरुस्ती करून ते भाडेतत्वावर देण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
एपीएमसी रोडवर आझमनगर कॉर्नर येथे महापालिकेच्या मालकीची मोठय़ा प्रमाणात जागा आहे. सदर जागेत महापालिकेने स्वच्छता कामगारांसाठी क्वॉर्टर्स बांधून दिले आहेत. तसेच याच परिसरात दोन गाळे देखील उभारले आहेत. मात्र येथील खुल्या जागेभोवती संरक्षक भिंत उभारण्यात आल्याने सदर गाळे बंदिस्त झाले आहेत. तसेच अलीकडेच येथील शेजारील जागेत बहुमजली रहिवासी संकुल उभारण्यात आले आहे. या परिसरात विविध व्यवसाय थाटण्यात आले असून असंख्य व्यावसायिकांनी फुटपाथवर ठाण मांडले आहे.
स्वच्छता कामगारांच्या वसाहतीमध्ये उभारण्यात आलेले गाळे दुरुस्त करून ते भाडेतत्वावर देणे शक्मय आहे. पण याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कित्येक वर्षांपासून हे गाळे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे महापालिकेचा महसूल देखील बुडाला आहे. व्यावसायिक गाळय़ांसाठी मोठय़ा प्रमाणात मागणी असून गाळे दुरुस्त करून भाडेतत्वावर दिल्यास महापालिकेला महसूल मिळण्याची शक्मयता आहे. यामुळे संरक्षण भिंतीचा भाग हटविण्यात यावा तसेच दुकानांची दुरुस्ती करून गाळे भाडेतत्वावर देण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.