जनसामान्यांत जागृतीचा अभाव : गैरसमज-अज्ञानामुळे सापांच्या संख्येत घट
प्रतिनिधी /बेळगाव
श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी विशेषतः सापांची व वारुळांची पूजा केली जाते. मात्र आता फक्त सापांची पूजा करून चालणार नाही तर सापांना वाचविण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे महत्त्व असले तरी दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्मयात आले आहे. अशा परिस्थितीत नागपंचमीनिमित्त नागाबरोबरच इतर सर्व सापांना समजावून घेण्याची खरी गरज आहे.
बेळगाव परिसरात सापांचा अधिवास असून 35 हून अधिक प्रजातीचे साप आढळतात. त्यापैकी काही विषारी तर काही बिनविषारी आहेत. आपल्या अवतीभोवती नाग, धामण सातत्याने निदर्शनास येत असले तरी मण्यार, घोणस, अजगर, गवत्या व इतर सापांचे देखील अस्तित्व आहे. विशेषतः वनक्षेत्र आणि शेती क्षेत्रात सापांची संख्या अधिक आहे. मात्र अलीकडे सापांविषयी असलेले गैरसमज आणि नैसर्गिकरित्या कमी झालेला अधिवास यामुळे सापांची संख्या घटली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱयाचा मित्र असलेल्या सापांना वाचविण्यासाठी प्रयत्न होणे ही काळाची गरज बनली आहे.
वनविभागाकडून जनजागृतीचा अभाव
वनविभागाकडून सर्पमित्रांसाठी विविध प्रशिक्षणे राबविण्याची गरज आहे. मात्र प्रशिक्षण तर सोडाच जनजागृतीदेखील केली जात नसल्याची खंत सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे. आजही सर्वसामान्यांमध्ये सापांविषयी असलेल्या गैरसमजुती आणि भीती दूर करून सापांना जीवदान देण्याची गरज आहे. याबरोबरच सापांच्या विविध जाती, निसर्गातील त्यांचे महत्त्व आणि सर्पदंशानंतर करण्यात येणारे प्रथमोपचार याबाबत वनविभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.
गतवषी शहरात अजगराचे दर्शन
सापांमध्ये सर्वात मोठा साप म्हणून ओळखल्या जाणाऱया अजगराचे गतवषी शहरात दर्शन झाले होते. महापुराच्या प्रवाहामुळे तो नाल्यात आढळून आला होता. अथक प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आले होते. तब्बल 12 फूट लांब आणि 35 किलो वजनाचा तो अजगर होता.
सापांकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलाला पाहिजे
नागपंचमीनिमित्त नागाची पूजा करतात आणि दुसरीकडे त्यालाच मारायला उठतात. जोपर्यंत सापांकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलणार नाही. तोपर्यंत साप आणि मानव यातील दरी कमी होणार नाही. अंधश्रद्धा, गैरसमज यांचा प्रभाव अधिक असल्याने सापांच्या हत्या अधिक होतात. यासाठी सापांबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
– आनंद चिठ्ठी (सर्पमित्र)
वनक्षेत्र वाढल्याने सापांची संख्या वाढली
परिसरात आढळून आलेले साप खात्याकडे सुपूर्द केले जातात. अलीकडे सापांची हत्या कमी झाली असून सापांना पकडून सोडून देण्यामुळे सापांची संख्या वाढली आहे. शिवाय खात्यामार्फत जनजागृतीदेखील केली जात आहे. वनक्षेत्र वाढल्याने वनक्षेत्रात सापांची संख्या वाढली आहे. शिवाय संवर्धन होण्यासाठी विविध उपाय हाती घेतले जात आहेत.’
– अर्जुन राकेशवाड (आरएफओ वनखाते)
बेळगाव परिसरात आढळणारे विषारी-बिनविषारी साप
विषारी साप | बिनविषारी साप |
नाग | धामण |
मण्यार | वेरूळा |
घोणस | तष्कर |
फुरसे | कवडय़ा |
गवत्या | |
अजगर | |
सर्पटोळ यासह इतर |