प्रतिनिधी/अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी येथे घरावर वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या बाभळीच्या झाडाच्या फांद्या काढत असताना चौघांनी मिळून मारहाण केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही घटना दि. ४ रोजी सकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अब्दुल महिबूब होटगी (वय ५० रा. शिरवळवाडी) यांच्या घरावर काल रात्री वादळी वाऱ्यामुळे बाभळीचे झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. सकाळी हे फांद्या काढत असताना यांच्या भावाचा मुलगा इकबाल फरीद होटगी, अरबाज फरीद होटगी, खैरून फरीद होटगी व फरीद मेहबुब होटगी हे चौघे मिळून फिर्यादी अब्दुल महिबूब होटगी यांस शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. यावेळी इकबाल होटगी याने खाली पडलेल्या दगडाने फिर्यादीच्या तोंडावर मारले त्यामुळे तोंडाला दगडाचा मार लागल्याने गालातून रक्त येऊ लागले व जखमी झाले. अशी फिर्याद अब्दुल होटगी यांनी वरील चौघा विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली असून चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विपीन सुरवसे हे करीत आहेत.