अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे परिसरात बुधवार रोजी ३ ऑगस्टरोजी दुपारी अचानक पावसाने थैमान घालत परिसर झोडपुन काढला. यात शेतीसह शेतीपिकांचे, घरांचे मोठे नूसकान झाले आहे. या झालेल्या नुसकानी मुळे शेतकरी चिंतामय झाल्याची माहिती अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना समजताच दि ४ रोजी तात्काळ बोरगाव गाव गाठले व नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केले. दुपारी पाऊस आला सगळा भाग जलमय झाला ओढे नदी नाले ओसंडून वाहत होते. ही माहिती मिळताच रात्रीच तलाठी चोरमुले, ग्रामसेवक आयुब बळोरगी यांनी बोरगाव मध्ये तळ ठोकून होते. गुरुवारी तहसीलदार शिरसाट नूसकान ग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता गावानजीक पुलाची अवस्था पाहिली. तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत गावातील घरांची पडझड, झालेले नुकसान याची नोंद करून घेतले. या व्यतिरिक्त कृषी अधिकारी सुद्धा बोरगावला भेट देऊन पाहणी केले. याच बरोबर जि. प. सदस्य आनंद तानवडे, प्रमोद गोरे, राजू राठोड यांनी सुद्धा गाव भेट दिले. बोरगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून योग्य त्या सूचना तहसीलदार बाळासाहेब शिरसाट दिल्या. दैनिक तरुण भारत संवादशी बोलताना तहसीलदार बाळासाहेब शिरसाट म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव भागात ५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यासंबंधी कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना झालेल्या नुकसानचे पाहणी करण्यासाठी सांगितले आहे. दि ४ रोजी बोरगाव बादोले वागदरी दहिटणे सिनुर आदी गावांना भेट देऊन पाहणी केले आहे. कुरनुर धरणातून ६०० क्यूसेकने सध्या विसर्ग सुरू असून धरण ८० टक्के भरला आहे. बोरगावच्या पूलाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले असून उद्या पुलाची पाहणी करतील. विमा कंपनीला सुद्धा सदर नुकसानी बाबत सूचना दिल्या आहेत.