मारोळी येथे नवनियुक्त सरपंचांच्या सत्कारावेळी व्यक्त केली अपेक्षा
मारोळी प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात पाणी येण्यासाठी तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी प्रयत्न करावेत असे बसवराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथे नवनियुक्त सरपंच व सदस्य यांचा सत्कार समारंभ मारोळी ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मंगळवेढा तालुक्याच्या नुकत्याच झालेल्या 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या कित्येक सरपंचांचा व सदस्यांचा मारोळी येथे सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मा. आ. प्रशांत परिचारक ,राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्यासह तालुक्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी दक्षिण भागातील पाण्यासाठी धडपड करणारे, संघर्ष करणारे, चळवळीचे नेते म्हणून श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बसवराज पाटील यांनी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेची गेली 25 ते 30 वर्षापासून एकच अपेक्षा आहे की या भागातील जनतेला शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे. हा भाग दुष्काळी भाग आहे दुष्काळामुळे कायम इथली जनता होरपळत आले आहे . स्व. आ.भारत भालके यांनी वेळोवेळी पाण्यासाठी विधानसभेत सातत्याने प्रश्न उपस्थित केल्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला गती मिळाली मात्र राज्याच्या सत्तांतरानंतर या प्रश्नाला काहीसा ब्रेक लागला. त्यामुळे बसवराज पाटील यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथल्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे विनंती यावेळी केली.
यावेळी मा. आ. प्रशांत परिचारक यांनी जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावरती खूप मोठे जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पडल्यास गावचा विकास नक्की होऊ शकतो असे ठणकावून सांगितले त्यासाठी सरपंचांनी वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून आपल्या भागाचा विकास करून घेण्याचे गरज आहे असे मत व्यक्त केले.
मंगळवेढा दक्षिण भागाचा पाण्याचा प्रश्न स्व . आ. भारत भालके यांनी उचलून धरला व त्यासाठी खूप प्रयत्न केले. वडिलांनी इथल्या जनतेला दिले दिलेले वचन म्हणजे कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवण्याची कायमस्वरूपी सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर जास्त आहे आणि दामाजी कारखान्याच्या माध्यमातून सध्याचे संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या हिताचे काम करेल आणि प्रत्येक शेतकरी आपले प्रश्न हक्काने मांडेल व त्या प्रश्नांचे निर्मूलन केले जाईल त्यामुळे इथून पुढे वडीलधारी मंडळी जे सांगतील त्या पद्धतीने राजकारणाची दिशा ठरवले जाईल असे मत भगीरथ भालके यांनी आपल्या भाषणावेळी व्यक्त केले.सत्कार समारंभाला मारोळीसह ,शिरनांदगी, फटेवाडी, उपस्थित होते
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील पाणी चळवळी च्या संघर्षात पुढाकार घेणारे गुलाब थोरबोले तानाजीराव काकडे ,रामकृष्ण जाधव पंचायत समिती सदस्य नितीन पाटील यांच्यासह दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील व्हाईस चेअरमन तानाजीराव खरात, लतीफ भाई तांबोळी, रामेश्वर मासाळ, औदुंबर वाडेदकर, गौरीशंकर बुरकूल यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.