प्रतिनिधी / सोलापूर
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर शहर व जिह्यात विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर ऊन व उकाडय़ामध्ये हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला.
पावसाळा सुरु होण्यासाठी आणखी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी असताना त्याअगोदरच गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानुसार यावर्षी पाऊस लवकर हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर दोन दिवसापासून शहर व जिह्यात वादळी वारे व पावसाचे वातावरण होते. मात्र गुरुवारी सकाळपासूनच हवेत मोठय़ा प्रमाणावर उकाडा जाणवत होता. दुपारी अचानक ढग येऊन दुपारी दोन वाजता पावसाला सुरुवात झाली. मात्र पुन्हा दोन तास विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पाच वाजता पुन्हा पाऊस पडण्यास सुरुवात झाली.
संध्याकाळपर्यंत शहरात पावसाची रिपरिप सुरुच होती. रात्रीपर्यंत पाउस सुरूच होता. शहराबरोबर जिह्यात देखील सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱयामध्येही आनंदाचे वातावरण दिसून आले. पावसाळा सुरु होण्याअगोदरच शेतकऱयांनी आपल्या शेतजमिनीची मशागत करुन ठेवली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी आणखी चांगल्या पावसाची गरज आहे. पुढील काळात अशाच प्रकारे आणखी दोन तीन मोठा पाऊस झाल्यास ग्रामीण भागात खरीप पेरण्या होण्याची शक्यता आहे.