जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची अधिकाऱयांना सूचना : अधिकाऱयांशी समन्वय साधून समस्या सोडविण्याची सक्त ताकीद
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर, कॅन्टोन्मेंट परिसर आणि उपनगरांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुख्यतः पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्याबद्दल अधिक तक्रारी आहेत. त्यामुळे एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांनी इतर अधिकाऱयांशी समन्वय साधून समस्या सोडविण्याची सक्त ताकीद जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना केली आहे.
काही भागांमध्ये विद्युतपुरवठा खंडित होत आहे. अशा तक्रारीदेखील वाढल्या आहेत. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी पिण्याचे पाणी, वीजपुरवठा सुरळीत करावा. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही. तक्रार आल्यानंतर तातडीने दखल घ्या. बऱयाचवेळा संबंधित कार्यालयातून थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत. अशी उत्तरे न देता वेळेत कामे करा, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
शहरामध्ये विशेषतः पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱयांनी नियोजन करावे. पार्किंगसाठी ज्या ठिकाणी जागा शिल्लक आहे, त्यांचा सर्व्हे करावा. आराखडा तयारीनंतर वरि÷ अधिकाऱयांशी चर्चा करून पार्किंग समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या, असे सांगण्यात आले.
रस्त्यांची दुरुस्तीही महत्त्वाची
पाणी, वीज आणि पार्किंग समस्येवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. महापालिका, हेस्कॉम आणि वनविभागाने यासाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे. जनतेच्या तक्रारी येवू नयेत, याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तेक्हा प्राधान्याने या सर्व समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱयांनी लक्ष द्यावे. रस्त्यांची दुरुस्तीही महत्त्वाची आहे. तेव्हा त्यादृष्टिनेही पाऊल उचलावे. याचबरोबर शहरामध्ये निर्माण होणाऱया समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, असे सांगण्यात आले.
या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. रुदेश घाळी, कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी आनंद, अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह महापालिका, हेस्कॉम व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंट परिसरातील तक्रारी दूर करा…
कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. त्यासाठी एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांनी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांशी सतत संपर्कात राहून तक्रारी दूर करण्याबाबत सांगण्यात आले. पावसामध्ये झाडे पडून वीजतारा तुटल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. वनविभाग आणि हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी संयुक्तपणे बैठक घेऊन तोडगा काढावा. एकमेकाला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच समस्या निकालात लागू शकतात, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.