ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला बहुमत गमवावं लागलं आणि त्या नंतर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघडी सरकार अखेर कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने बहुमत चाचणी मात्र टळली. या सगळ्या घाटना घडामोडी नंतर भाजपच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी दावा सुद्धा केला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्या नंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अश्याच प्रतिक्रिया प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत भाजपवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज (Actor Prakash Raj) यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. सोबतच उद्धव ठाकरे यांची उत्तम काम केले आहे असं सांगत, ‘चाणक्य’ असं म्हणत अभिनेते प्रकाश राज यांनी भाजप वर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला टॅग करत प्रकाश राज यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रकाश राज यांनी ट्वीटमध्ये उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. “उद्धव ठाकरे सर, तुम्ही उत्तम काम केले आहे. ज्यापद्धतीने तुम्ही राज्यातील परिस्थिती हाताळली ती पाहता मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. आज चाणक्य लाडू खात असले तरी तुमचा प्रामाणिकपणा दिर्घकालीन आहे. तुम्हाला अधिक शक्ती मिळो” या आशयाचे ट्वीट प्रकाश राज यांनी केले आहे.