सर्वत्र भक्तीमय वातावरण : दोन वर्षांनंतर धोंडाचे मंडप गजबजले : तीन दिवशीय सोवळेव्रताला आजपासून प्रारंभ.
डिचोली/प्रतिनिधी
शिरगाव येथील प्रसिद्ध श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी कडक सोवळे व्रत पाळणाऱया धोंडगणांच्या व्रताला रविवारीपासून प्रारंभ झाला. पाच दिवस सोवळे व्रत पाळणाऱया धोंडगणांनी रविवारी आपल्या व्रताला प्रारंभ केला. तर तीन दिवसांचे सोवळे व्रत पाळणारे धोंडगण आज मंगळ. दि. 3 मे रोजी आपापल्या व्रताच्या ठिकाणी जाणार आहेत. दोन वर्षांनंतर “धोंडाचे मंडप” गजबजू लागले आहेत. तर आज मंगळवारपासून सर्वच धोंडगण एकत्रित येणार असल्याने य भक्तीमय वातावरणातील मोठी भक्ती पहायला मिळणार आहे.
शिरगावची जत्रा म्हणजे भाविक भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते. या जत्रोत्सवाची आतुरता जितकी भक्तजन, धोंडगण आणि शिरगावातील लोकां?ना असते. तितकीच आतुरता देवी लईराईलाही असते. म्हणूनच देवी दरवषी आपल्या जत्रोत्सवातील सर्व धोंडगणांचा सांभाळ करीत त्यांच्याकडून काटेकोरपणे आपले सोवळे व्रत पाळून घेते. या व्रतातील शक्तीच प्रत्येक धोंडगणाला देवीचे अग्निदिव्य पार करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असते. यावषी दोन वर्षांच्या खंडानंतर जत्रोत्सव व होमकुंड सोहळा पार पडत असल्याने शिरगावात भाविक भक्तांचा महामेळावाच जमणार आहे.
या जत्रोत्सवातील सर्वात मोठे होमकुंड रचण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे. शिरगाव जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन झालर परिधान करघत आहे. तसेच देवीच्या आपल्या अंगणातील सवागतासाठी प्रत्येक घराचे अंगण आणि घर सजत आहे. अंगणात खास झावळय़ांचा मंडप उभारण्यात आले आहेत. या पाच दिवशीय महासोहळय़ासाठी शिरगाव सजत आहे.
शिरगावाबरोबरच सर्व ठिकाणी देवीच्या अगाध श्रध्देने गेला महिनाभर शाकाहार पाळून आता पूर्णपणे सोवळे व्रत पाळण्यासाठी तयार झालेले धोंडगणही देवीच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. दैनंदिन जिवनातून दूर जात लोकवस्तीपासून अलिप्त अशा पवित्र पाण्याच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱया धोंडगणांसाठीही हि जत्रा म्हणजे पर्वणीच असते. देवीच्या श्रध्देवर विश्वास ठेऊन प्रत्येक धोंडगण आपली सजवा रूजू करीत असतो. त्यासाठीच या सोवळे व्रताला प्रत्येक धोंडगण न्याय देत असतो. या पाच व तीन दिवशीय सोवळे व्रतानंतर जत्रोत्सवाच्या आदल्या रात्री म्हणेच बुध. दि. 4 मे रोजी भाविकांसाठी “व्ह?डले जेवण” होणार आहे. या जत्रोत्सवासाठी डिचोली, साखळी, अस्नोडा बाजारपेठा भरल्या आहेत. रेडीमेड सोवळी, शाल, धोंडगणांना लागणारे कपडे, चप्पले व इतर सामानाने बाजार फुलला आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात फळे बाजारात दाखल झाली आहे. या सामानाच्या खरेदीसाठी बाजारात धोंडगणांची गर्दी होत आहे.