नामस्मरणाने तळावर चैतन्यमय वातावरण
प्रतिनिधी /वाळपई
जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱया शिरगाव येथील लईराई देवीच्या सुप्रसिद्ध जत्रोत्सवाला अवघे दिवस शिल्लक राहिले आहेत. सत्तरी तालुक्मयात धोंडगणानी सोहळे व्रत सुरू केले असून पवित्र ठिकाणे धोंडगणांनी गजबजू लागले आहेत. पुढील चार दिवस धोंड व्रत पाळणार आहेत.
सत्तरी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात शिरगाव देवीचे धोंड व्रत पाळतात. जवळपास चार हजार पेक्षा जास्त धोंड विविध तळावर देवीचे व्रत पाळत असतात. चार दिवस कडक व्रत पाळताना देवीच्या नामस्मरणाचा गजर ऐकायला मिळू लागला आहे. कीर्तनकार सुहासबुवा वझे यांनी अनेक तळावर जाऊन नामस्मरणाचा जयघोष सुरू केलेला आहे. यात मोठय़ा प्रमाणात धोंड भाग घेत असून चैतन्यमय वातावरण तळावर निर्माण होताना दिसत आहे. या नामस्मरणातून बळ प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे अध्यात्मिक शक्ती जागृत होऊन प्रत्येकामध्ये ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता नामस्मरणामध्ये असल्याचे धोंड बांधवांनी सांगितले.
हिदोडे – सत्तरी येथील तळावर सुहास बुवा वझे यांनी आयोजित केलेल्या नामस्मरणाच्या उपक्रमांमध्ये मोठय़ा प्रमाणात धोंडगणांनी सहभाग घेतला. 4000 नामस्मरणाचा जयघोष करण्यात आला होता.
सर्वेश गावकर यांनी, या नामस्मरणामुळे सोहळे व्रताला एक विशिष्ट प्रति÷ा लाभत असते. त्याचप्रमाणे वेगळी ऊर्जा अंगामध्ये निर्माण होत असून प्रत्येकाने नामस्मरणामधे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, म्हाऊस येथील धोंड बांधवांनी व्रताला सुरुवात केलेली आहे. गेल्या दोन दिवसापासून सोवळे व्रत पाळण्यास सुरुवात केल्याची माहिती देविदास गावकर यांनी दिली.