प्रतिनिधी/ सातारा
सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे सामुदायिक श्री हनुमान उपासना ही उपासना 2007 सालापासून सुरू झाली प्रथम श्रीक्षेत्र चाफळ नंतर सज्जनगड व त्यानंतर समर्थ स्थापित अकरा मारुती पैकी माजगाव ,पारगाव आणि वारणा- अमृत नगर येथेही उपासना सुरू झाली त्यावेळी या उपासनेसाठी साधारण 2000 होऊन हनुमान भक्तांची उपस्थिती असे.
नियोजनाच्या दृष्टीने अडचणी येऊ नयेत म्हणून समर्थांचा मुख्यमठ हा चाफळचा म्हणून त्यापुढील सर्व उपासना श्रीक्षेत्र चाफळ येथे सुरू झाल्या आणि त्या आजही मोठय़ा उत्साहात सुरू आहेत गेली दोन वर्षे कोरोना सारख्या महामारीमुळे त्यात थोडा विस्कळीतपणा आला मात्र यावर्षीही उपासना 27 ऑगस्ट रोजी शनिवारी ठरल्याप्रमाणे होणार आहे .कोरोनाच्या काळात ही उपासना सर्व भक्तांनी आपापल्या घरी व त्यांच्या गावी करावी असे आवाहन करण्यात आले होते. ते अनेकांनी जसेच्या तसे पाळले. पुढे जवळच्या हनुमान मंदिरात हीच उपासना सुरू झाली आजही अनेक गावी ती सुरू आहे. त्यातल्या त्यात श्रावणातल्या तिस्रया शनिवारी विशेषत्वे करून ही उपासना साजरी होते.
ही हनुमान उपासना समर्थ सदन सातारा येथेही संपन्न व्हावी असे अनेक समर्थ भक्तांचा आग्रह असल्यामुळे त्याला मान देऊन श्रावणातील चौथ्या शनिवारी ही उपासना मोठय़ा उत्साहात संपन्न झाली .या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजनासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. यामध्ये समर्थ भक्त अनंतराव बोधे ,नारायण मुळे सर, समर्थ भक्त बाळू बुवा रामदासी ,श्री .भंडारी ,प्रवीण कुलकर्णी, राजू कुलकर्णी ,मोहन साठे , सौ.कल्पना ताडे, सौ. जयश्री कुलकर्णी आदी मंडळींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सातायातील दासबोध अभ्यास मंडळे, रामदास स्वामी भक्त मंडळ यांचे कार्यकर्ते व अनेक समर्थ भक्त उपस्थित होते. विशेषत्वाने हा कार्यक्रम आता दरवर्षी व्हावा असे अनेकांनी आपल्या मनोगत आतून बोलून दाखवले आणि त्याप्रमाणे तो दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.