30 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत : 6 नोव्हेंबरला होणार परीक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षक भरती होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून यावषी शिक्षक भरती मोठय़ा प्रमाणात होणार असल्याने टीईटी देणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
शिक्षक म्हणून भरती होण्यापूर्वी त्या उमेदवाराला टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झाल्यानंतरच तो विद्यार्थी सीईटीसाठी पात्र ठरतो. डीएड् व बीएड्धारक विद्यार्थी टीईटीला सामोरे जाऊ शकतात. वर्षातून दोनवेळा टीईटी घेण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार 6 नोव्हेंबर रोजी टीईटी होणार आहे.
या परीक्षेसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारांना दहावी, बारावी व डीएड् अथवा बीएड् प्रमाणपत्र, आधारकार्ड, फोटो यासह अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी इंटरनेट कॅफेमध्ये गर्दी होत आहे. यावषी राज्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे मराठी, कन्नड, इंग्रजी व उर्दू या चारही माध्यमाचे विद्यार्थी टीईटी देण्यास उत्सुक आहेत.
वेगवेगळे परीक्षा शुल्क
इच्छुक डीएड् व बीएड्धारकांनी www.schooleducation.kar.in या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. पहिली ते पाचवीसाठी पहिला पेपर तर सहावी ते आठवीसाठी दुसरा पेपर घेतला जाणार आहे. एका पेपरसाठी अर्ज करणाऱयांना 700 तर दोन्ही पेपरसाठी अर्ज करणाऱयांना 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.