नागरिकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
संभाजीनगर-वडगावचा विस्तार वाढला आहे. संभाजीनगरबरोबरच या ठिकाणी अनेक नगरे जोडली गेली आहेत. मात्र या ठिकाणी बस येत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना पायपीट करीत विष्णू गल्ली-वडगाव येथे यावे लागत आहे. तेव्हा तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यापूर्वीही अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा तातडीने बस सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
संभाजीनगर, यरमाळ रोड यासह इतर परिसरातील नागरिकांना बसची नितांत गरज आहे. शेवटच्या बसथांब्यापर्यंत बस सुरू केली तर विद्यार्थ्यांबरोबरच ज्ये÷ नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. या ठिकाणी रिक्षा किंवा इतर भाडोत्री वाहने घेऊनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. तेव्हा याचा विचार करून बस सुरू करा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनोहर शिरोडकर यांच्यासह वकील उपस्थित होते.