प्रतिनिधी / बेळगाव : शहरातील नाले तसेच बेळ्ळारी नाल्याच्या खोदाई संदर्भात पाठपुरावा करण्यासंबंधी बेळगाव शेतकरी संघटनेने पालकमंत्री गोविंद कारजोळ यांना निवेदन दिले. या नाल्याची तातडीने खोदाई करावी कायमस्वरूपी तोडगा काढावा, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावे. सध्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, सुनील जाधव, जोतिबा दौलतकर यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम बी बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील उपस्थित होते.