खानापूर तालुक्यातील कापोली,घोटगाळी ग्रामपंचायत क्षेत्रातील १५ गावांचा वीजपुरवठा गेल्या दोन दिवसापासून बंद करण्यात आला आहे. यासाठी दापोली ग्रामपंचायत सर्व माडवाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी आज वनाधिकारी वेंकटेश यांना निवेदन देऊन बंद असलेला विजपुरवठा सुरु करण्याबाबत हेस्कॉमला लेखी कळवावे अशा आशयाचे निवेदन दिले . हेस्कॉमने वन खात्याकडे बोट दाखवून या भागात हत्ती आल्याने हेस्कॉमने या भागातील वीज पुरवठा बंद केला आहे. याबाबत माहिती अशी मागील वर्षी या भागात जंगली हत्तीचा विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी खानापूर तालुका हेस्कॉमच्या तालुका अधिकारी कल्पना तिरविर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे खानापूर हेस्कॉमच्या ए इ इ कल्पना तिरविर यांनी या भागातील वीज पुरवठा गेल्या दोन दिवसापासून बंद केला आहे . याबाबत वनाधिकारी वेंकटेश यांना विचारले असता ते म्हणाले मागील वर्षी हेस्कॉमच्या बेजबाबदारपणामुळे एक हत्तीचा मृत्यू झाला आहे. आम्ही सुरू असलेला विद्युत पुरवठा बंद करा म्हणालेलो नाही आमची तक्रार नाही .मात्र हेस्कॉम आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत असल्याचे ए सी एफ यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. याबाबत हेस्कॉमलाही निवेदन देण्यात आले आहे.
Previous Articleसागरी तालुक्यांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला
Next Article दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करावे